Uncategorized

भारताकडूनही जोरदार प्रत्युत्तर; पाकिस्तानी फायटर ताब्यात…

भारताकडूनही जोरदार प्रत्युत्तर; पाकिस्तानी फायटर ताब्यात…

मुंबई, ता. ०८ : भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी सैन्याने आज रात्री उशिरा जम्मू मधील सीमा भागात हल्ला केला. यावेळी भारताचे पंचवीस ड्रोन पाडण्यात आले. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताकडून हल्ला सुरू करण्यात आला असून पाकिस्तानी फायटर ताब्यात घेतला आहे.

पाकिस्तानने भारताच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागल्याचे वृत्त आहे, जे भारताने आपल्या हवाई सुरक्षा प्रणालीने नष्ट केले. भारतानेही पाकिस्तानचे ड्रोन हल्ले हाणून पाडल्याचा दावा केला आहे. अमेरिकेने लाहोरमधील आपल्या नागरिकांसाठी सुरक्षा सूचना जारी केल्या आहेत. भारताने आपले हल्ले दहशतवादी ठिकाणांवरच केंद्रित होते आणि त्यात कोणतीही लष्करी मालमत्ता लक्ष्य केली गेली नाही, असे म्हटले आहे. पाकिस्तानने काही काळासाठी आपली हवाई हद्द बंद केली होती, परंतु आता ती पुन्हा उघडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button